07/10/2021
आज पुण्यात गावात गेलो असतानाचे एक दृश्य बघितले एक 5-6 वर्षचा मुलगा होता. उद्या पासून शारदीय नवरात्र सुरू होतंय त्यामुळं तिथं तो माती विकत होता (घट बसवण्यासाठी लोक मातीचा उपयोग करतात) दुपारचे 12.30 वाजले होते ऊन तर खूप होत. हा मुलगा माती विकत उन्हात बसला मला राहवलं नाही मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारले कशी दिलीस रे माती १० रुपये ला 1/2 तांब्या आणि 20 रुपयाला २ भरुन तांब्या, बर म्हणलं मी मग आणि विचारलं मग किती विकलीस माती सकाळपासून, त्याचा चेहरा खूपच पडला म्हणाला दादा सकाळी ८:३० वाजता बसलो पण कोणीच आल नाही गिर्हाईक , बर म्हणलं आणि काही खाल्ला का सकाळ पासून तस म्हणाल्या वर त्याच्या डोळ्यातुन पाणी आलं म्हणाला दादा आई ने सकाळी फक्त 1/2 कप चहा करून दिलाय फक्त निघताना आणि आई कामाला गेली आणि हे विकल्याशिवाय मला काहीही खायला मिळणार नाही, मी लगेच तिथं असणाऱ्या वडापाव च्या गाड्यावर नेलं आणि वडापाव खायला दिले , मी इथं माझा मोठेपणा काहीही सांगत नाही पण या वयात त्याच कष्ट खूपच मोठं आहेत असं वाटतंय. त्यानं पोट भरून खाल्ल्यावर एक समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. म्हणाला दादा जातो ते बगा एक गिराईक आलं. आणि नकळत माझ्या पाया पडून पळत गेला. मला कस तरीच वाटलं , मी लगेच त्याच्या जवळ गेलो पाया कश्याला पडलास रे त्यावर तो म्हणाला दादा आईनं सांगितलं ज्याच्यामुळ आपलं पोट भरलं त्याला देवानं पाठवलेलं असत आणि देव त्याच्या रूपात येऊन गेलेला असतो , माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, एवढया कमी वयात खूप कळत होत त्याला, उद्या पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र देवीला एकच माझं मागणं ही गरिबीची दरी लवकर मिटव , आणि याना सामर्थ्यवान बनव
मयुरेश सूर्यवंशी
माझी पोस्ट नावासाहित share करावी