Welcome to Mumbai

Welcome to Mumbai Welcome to Mumbai

*कोकण-एमएमआरमध्ये उष्णतेचा कहर; कर्जत ४२.६°C तर कल्याण डोंबिवलीचा पारा ४१.५°C वर*कल्याण डोंबिवली | 8 मे :मे महिन्याच्या ...
10/05/2026

*कोकण-एमएमआरमध्ये उष्णतेचा कहर; कर्जत ४२.६°C तर कल्याण डोंबिवलीचा पारा ४१.५°C वर*

कल्याण डोंबिवली | 8 मे :
मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण आणि मुंबई महानगर प्रदेशात (MMR) उष्णतेने अक्षरशः कहर माजवला असून अनेक शहरांतील तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत कोकण भागात ‘हीटवेव्ह’ अर्थात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली असून येत्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, समुद्राकडून येणारे दमट वारे आणि वाढती आर्द्रता यामुळे प्रत्यक्ष जाणवणारे तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअसप्रमाणे जाणवू शकते,असा इशाराही मोडक यांनी दिला आहे.

शहरनिहाय आजचे तापमान

* कर्जत – ४२.६°C
* कल्याण – ४१.५°C
* डोंबिवली – ४१.३°
* बदलापूर – ४१.४°C
* नेरळ – ४२.४°C
* पळावा – ४२°C
* अंबरनाथ – ४१.८°C
* मोर्बे – ४१.७°C
* तळोजा – ४१.६°C
* चिपळूण – ४१.२°C
* मुंब्रा – ४०.९°C
* खारघर – ४०.८°C
* पनवेल – ४०.२°C
* मनोर – ४०°C
* दिघा – ३९.९°C
* कळवा – ३९.८°C
* कोपरखैरणे – ३९.४°C
* ऐरोली – ३९.३°C
* ठाणे – ३९°C
* नवी मुंबई विमानतळ – ३८.८°C
* मुलुंड – ३८.२°C
* कांजूरमार्ग व बेलापूर – ३८°C
* वाशी व नेरुळ – ३७.९°C

हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना व्यक्त केलेल्या अंदाजानुसार किनारपट्टी भागात तापमान ३८.५ अंशांच्या पुढे गेल्यास ‘हीटवेव्ह’सदृश परिस्थिती मानली जाते. तर घाट परिसरालगतच्या अंतर्गत भागात ४० अंशांवरील तापमान उष्णतेच्या लाटेचे संकेत मानले जातात. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कर्जत, नेरळ आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

नागरिकांना सतर्कतेचा सल्ला...

* दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळा
* भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्या
* लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या
* डोके झाकूनच बाहेर पडा
* उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या

दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून एसी, कूलर आणि पंख्यांच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
News Credits:-

दहावीच्या परीक्षेत के.सी.गांधी शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम; सामन्यू वर्तक ९९.२०% गुणांसह शाळेत प्रथमकल...
10/05/2026

दहावीच्या परीक्षेत के.सी.गांधी शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम; सामन्यू वर्तक ९९.२०% गुणांसह शाळेत प्रथम

कल्याण | 9 मे :
कल्याण येथील श्रीमती कांताबेन चंदुलाल गांधी म्हणजेच के.सी. गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेतील उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा शाळेतील सर्वच्या सर्व २६९ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे सचिव मनोहर पालन यांनी दिली आहे.

यंदाच्या निकालात मास्टर सामन्यू चंदन वर्तक याने ९९.२० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर विग्नेश श्रीनिवास पै याने ९८.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. स्वामिनी सतीश वाळुंज, तनिष्का प्रसाद उपाध्ये आणि हर्ष सतीशकुमार वर्मा या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९७.८० टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले.

विशेष बाब म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा गौरव वाढवला आहे. अथर्व अविनाश पाटील याने ८२.६० टक्के तर सुप्रिया गणेश उमप हिने ८१.६० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या एकूण निकालानुसार:

* ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ७६
* ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ९७
* ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ३५
* ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी – ५६

विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

News Credits :- LNN

08/05/2026

कल्याणातील धुळीच्या वादळाचा आणखी एक व्हिडिओ झाला आहे..

व्हिडिओ माहिती सौजन्य : एलएनएन सिटीझन रिपोर्टर
News Credits :-

ऐरोली - काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात; उर्वरित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरुखा. डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यां...
08/05/2026

ऐरोली - काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात; उर्वरित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु

खा. डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाला गती

कल्याण | 8 मे :
मुंबईच्या मुक्त मार्गाच्या (फ्री वे) धर्तीवर उभारण्यात येत असलेला आणि नवी मुंबई ते डोंबिवली अंतर काही मिनिटांवर आणणाऱ्या ऐरोली काटई मुक्त मार्गाच्या उभारणीतील कोंडी लवकरच फुटणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेच्या उपलब्धतेसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी नोटीस जाहीर केले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने साकारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पार करता येणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघातील वाहतूक जलद व्हावी यासाठी अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. मेट्रो १२, मेट्रो ५ आणि मेट्रो ५ चा उल्हासनगर,अंबरनाथ बदलापूर तसेच टिटवाळा पर्यंत विस्तार, विविध महत्वाचे उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, सॅटिस यांसारखे अनेक मेगा प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ.शिंदे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ऐरोली ते काटई फ्री वेची निर्मिती केली जाते आहे. या मार्गात ऐरोली भागातील खाडीपासून या मार्गाची सुरूवात होते. तर हा मार्ग डोंबिवलीजवळी काटई चौकात येऊन उतरणार आहे. हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून हा मार्ग शिळफाटा येथील डोंगरातून ऐरोलीला जातो. यातील बोगदा तयार असून ऐरोली दिशेच्या बहुतांश भागाचे काम पूर्ण झाले आहे. तर मुंब्रा वाय जंक्शन पुलावरून या रस्त्याची मार्गिका जाते. बोगदा आणि बोगद्यातून येणारा मार्ग मुंब्रा वाय जंक्शन पुलावर येऊन थांबला आहे.

पुढच्या टप्प्यातील कामासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने या मार्गाचे काम रखडले होते. ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या या भागातील भूसंपादन करून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अनेक प्रयत्नशील होते. अखेर या मार्गात आवश्यक जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नोटीस जाहीर करण्यात आले आहे. यात आवश्यक जागेचा तपशील आणि गावांच्या नावांची माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला ही जागा खुली आहे, त्यामुळे कोणत्याही भूखंडधारकाचे यात विस्थापन होणार नाही.
News Credits:- LNN

कल्याणातील सॅटीस प्रकल्प; 'UHPFRC' तंत्रज्ञानाद्वारे निर्मित गर्डरचे यशस्वी लॉन्चिंगमिसिंग लिंक प्रकल्पातही वापरण्यात आल...
08/05/2026

कल्याणातील सॅटीस प्रकल्प; 'UHPFRC' तंत्रज्ञानाद्वारे निर्मित गर्डरचे यशस्वी लॉन्चिंग

मिसिंग लिंक प्रकल्पातही वापरण्यात आलेय हेच तंत्रज्ञान

कल्याण | 5 मे :
स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SKDCL) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पाने (SATIS) आता आधुनिकतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या प्रकल्पातील सुभाषचंद्र बोस चौक ते बैलबाजार चौकादरम्यान उभारण्यात येणाऱ्या सुमारे ११२५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या उड्डाणपुलाच्या Span AP14-ACP1 आणि ACP1-ACP2 या भागात बांधकामासाठी 'अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्ड काँक्रीट (UHPFRC)' या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या स्ट्रक्चरल डिझाइनची पडताळणी IIT Bombay यांच्यामार्फत करण्यात आली असून, त्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेला भक्कम आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लोकार्पण झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातही अशाच प्रकारचे अल्ट्रा-हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्ड काँक्रीट (UHPFRC)' तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

कल्याण स्टेशन परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक (प्रवेशद्वार क्र. ०१) येथे असलेला विद्यमान पादचारी पूल (FOB) हटविणे अपरिहार्य होते. मात्र, प्रवाशांची मोठी वर्दळ लक्षात घेता तो पर्याय टाळून त्याऐवजी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत काल मध्यरात्री गर्डर लॉन्चिंग यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

यावेळी महापौर अॅड. हर्षाली थविल चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि कंत्राटदार उपस्थित होते.

UHPFRC तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये...

UHPFRC हे पारंपरिक काँक्रीटपेक्षा अनेक पटीने अधिक मजबूत, लवचिक आणि टिकाऊ आहे. सिमेंट, सिलिका फ्युम, विशेष स्टील फायबर्स आणि रसायनांच्या मिश्रणातून तयार होणारे हे काँक्रीट स्टीलसारखी मजबुती प्रदान करते.

* संकुचन शक्ती पारंपरिक काँक्रीटपेक्षा ५ ते ६ पट अधिक

* अत्यंत दाट रचना, त्यामुळे हवामान व प्रदूषणाचा परिणाम कमी

* पुलाचे आयुष्य १०० वर्षांपेक्षा अधिक

* भूकंपासारख्या आपत्तींमध्ये अधिक सुरक्षित

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून वापरण्यात आलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शहराच्या पायाभूत सुविधांना नवी दिशा मिळणार.
News Credits :-

अवघ्या ८ दिवसांत पूर्ण केले वालधुनी उड्डाणपुल दुरुस्तीचे काम; पुढची 5 वर्षे कंत्राटदारावर असणार मेंटेनन्सची जबाबदारीकल्य...
30/12/2025

अवघ्या ८ दिवसांत पूर्ण केले वालधुनी उड्डाणपुल दुरुस्तीचे काम; पुढची 5 वर्षे कंत्राटदारावर असणार मेंटेनन्सची जबाबदारी

कल्याण दि.30 डिसेंबर :
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने वालधुनी उड्डाणपुलाची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार अवघ्या 8 दिवसांत ही दुरुस्ती पूर्ण करून हा उड्डाणपूल सोमवारपासून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
..म्हणून काम 8 दिवसांत झाले पूर्ण
या निर्णयामुळे कल्याण - डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शेजारील शहरांतील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुरुस्ती कामासाठी महानगरपालिकेने सुरुवातीला २० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत पुल २० दिवस बंद ठेवण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडे मागितली होती. मात्र, 24 तास सुरू असलेले काम, अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या तैनातीमुळे हे काम अपेक्षेपेक्षा वेगाने पूर्ण करण्यात आले.

इतर किरकोळ कामे पुढील दोन आठवड्यांत...
विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावरील मुख्य दुरुस्ती काम पूर्ण झाले असून पदपथ दुरुस्ती, रंगरंगोटी तसेच इतर किरकोळ कामे पुढील दोन आठवड्यांत पुलावरील वाहतूक सुरू ठेवून पूर्ण करण्यात येणार आहेत.

5 वर्षे रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर...
या दुरुस्ती कामाचे मुख्य कंत्राट शाह इंजिनिअर्स यांना देण्यात आले होते, तर जय भारत कन्स्ट्रक्शन उपकंत्राटदार म्हणून कार्यरत होते. ठरवून दिलेल्या गुणवत्ता निकषांनुसार डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून करारातील अटींनुसार पुढील पाच वर्षे रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशीयांनी दिली आहे.

महानगरपालिकेच्या या जलद आणि प्रभावी कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून शहरातील दैनंदिन वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.
व्हिडिओ माहिती सौजन्य: एलएनएन सिटीजन रिपोर्टर
Follow for More ✅
👉Follow Welcome to Kalyan
👉Follow Welcome to Kalyan

28/12/2025

🏡 Discover Heaven Enclave – Your Dream Home in Kalyan West! ✨ 1, 2 & 3 BHK homes starting at just ₹39 L all‑in!📞Contact: 8286334477
📩Get More Details: https://wa.link/sqa1jd
⬇️Download Brochure: https://wa.link/sqa1jd

✔️ Loan Facility Available
✔️ Premium Amenities
✔️ Modern, Smart Living Spaces
📍 Located in the fast‑growing Kalyan West, near Khadakpada – perfect for families & investors!

🆕 Live the lifestyle you deserve — schedule your site visit today!

कल्याण | दि.18 डिसेंबर :अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई करत कल्याण पोलिसांनी 35 किलो गांजासह आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफ...
20/12/2025

कल्याण | दि.18 डिसेंबर :
अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई करत कल्याण पोलिसांनी 35 किलो गांजासह आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. महात्मा फुले पोलीस व कल्याण वाहतूक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 14 पैकी 8 आरोपींना मकोका कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून 6 आरोपी फरार आहेत.
वालधुनी परिसरात नाकाबंदीदरम्यान संशयास्पद कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून कार पकडली असता 35 किलो गांजा व गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. ही टोळी नागपूर, अमरावती, भंडारा व ठाणे जिल्ह्यात सक्रिय असून आरोपींवर एनडीपीएस अंतर्गत 40 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली.
News Credit: LNN

Follow for More ✅
👉Follow Welcome to Kalyan
👉Follow Welcome to Kalyan

17/12/2025

👑✨ WEDDING SEASON SPECIAL ✨👑

Make your Grand Entry truly ROYAL 🚘💍
Our ROYAL VINTAGE CAR is now available for Wedding Bookings

⏳ Limited Slots Only – Book Today!
Because every Grand Entry Deserves a Royal Ride 👑

📍 Location: Near Durgadi Fort, Kalyan
📞 Contact: Paru Bhai
📲 9867391152 | 9082413523

👉 Must Visit Our Instagram Page
🔗 https://www.instagram.com/paru_bhai_kalyan
👉 Post shared by Welcome to Kalyan — your go-to page for the best local updates, businesses & events in Kalyan!
📲 Follow us for more such local promotions & city highlights! 💛
➡️ Welcome to Kalyan

Address

Office No. 03, Neharika Building, Behind Sadhana Hotel, Opp. Kalyan Staion
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Welcome to Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share