बोईसर तारापूर मिञ

बोईसर तारापूर मिञ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बोईसर तारापूर मिञ, Social Media Agency, Tarapur Road, Mumbai.

🚩 बोईसर-तारापूर परिसरातील व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, नोकरी विषयक माहिती आणि लोकसमस्या मांडणारे आपले हक्काचे व्यासपीठ!
💼 MIDC जॉब अपडेट्स | 📢 नागरी समस्या | 🚆 रेल्वे व ट्रॅफिक अपडेट्स
🤝 सदैव आपल्या सेवेत - बोईसर तारापूर मित्र.

Every child is special, and their journey should be too ✨At *SARAF WISDOM SCHOOL*, we celebrate individuality and nurtur...
23/05/2026

Every child is special, and their journey should be too ✨
At *SARAF WISDOM SCHOOL*, we celebrate individuality and nurture each child’s unique talents.
📢 Admissions Open for 2026–2027
🎒 Nursery to Grade 5
📞 Call now: 89768 18031 / 89768 18032
Help your child shine in their own way—*Register Now*!

22/05/2026

#मोदींसाठी_जीवाची_बाजी
पेट्रोल डिझेल बचतीसाठी जीव धोक्यात...

20/05/2026


20/05/2026

₹ v/s $

20/05/2026

.

20/05/2026

💥 पुण्यात कायदा-सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर? नवले ब्रीजवर रिक्षाचालकावर कोयता गँगचा थरारक हल्ला! 😡👇

पुण्यात गुन्हेगारांचे धाडस एवढे वाढले आहे का, की दिवसाढवळ्या मुख्य रस्त्यावर कोणावरही हल्ला व्हावा? नवले ब्रीज परिसरात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत माजवत एका रिक्षाचालकाला लक्ष्य केले. हा हल्ला इतका भयानक आणि थरकाप उडविणारा होता की, रिक्षावाला पुलाचे छप्पर तुटून खाली पडला. भर दिवसा असे भयानक गुन्हे पोलीस आणि प्रशासन यांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण करत आहेत.

टोळी युद्ध, गुंडांची दहशत आणि कोयता गँगच्या हैदोसाने सामान्य पुणेकर असुरक्षित झाला आहे. पोलिसांचा धाक संपलाय का? की गृहखातं केवळ बघ्याची भूमिका घेतंय? वाढत्या गुन्हेगारीला वेळीच ठेचले नाही, तर पुणे 'गुन्हेगारांचे नंदनवन' व्हायला वेळ लागणार नाही!

📢 तुम्हाला काय वाटते? पुण्यात पोलिसांचा वचक खरोखरच संपला आहे का? कमेंट करा आणि शेअर करा!

19/05/2026

*मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणार*

*जखमींवरील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार*

*....आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*

पालघर, दि. १९ मे २०२६ : धानीवरी येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी बांधवांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व स्वीकारणार असून, जखमींवरील उपचारांचा १०० टक्के खर्च शासन उचलणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.

अंत्यसंस्कारासाठी डॉ हेमंत सवरा, आमदार सर्व श्री. राजेंद्र गावित, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, विलास तरे, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते
बापूगाव व लाखातपाडा येथील आदिवासी कुटुंब साक्षगंध (साखरपुडा) कार्यक्रमासाठी आयशर टेम्पोमधून प्रवास करत असताना धानीवरी परिसरा मध्ये झालेल्या अपघातात एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पैकी १२ जणांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.यामध्ये बापूगाव व लाखातपाडा येथील १२ तर वांगर्जे येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या १७ जणांवर वेदांत रुग्णालयात उपचार सुरू असून, औषधे, शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व वैद्यकीय खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले.
“कोणत्याही कुटुंबाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आदिवासी विकास विभाग या सर्व कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची तात्काळ दखल घेत मदतीची घोषणा केल्याचे सांगताना आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके म्हणाले की, जिल्हाधिकारी, आणि प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बाधित कुटुंबांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांच्या गरजा आणि समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार आहे.
“ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. हा आघात विसरणे शक्य नाही; मात्र या संकटाचा सामना करण्याची शक्ती सर्वांना लाभो,” अशा भावना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केल्या.

19/05/2026

🚨 #जागतिक_मंचावर_भारताचे_पंतप्रधान_प्रश्नांपासून_दूर_का_पळाले ?

**"जेव्हा लपवण्यासारखं काही नसतं, तेव्हा घाबरण्यासारखंही काही नसतं!"**

**काय आहे नेमके प्रकरण?**
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात (Press Freedom Index) पहिल्या क्रमांकावर असलेल्या **नॉर्वेच्या महिला पत्रकार हेले लिंग** यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक थेट प्रश्न विचारला: *"तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही?"*
मात्र, पंतप्रधानांनी या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि ते तिथून निघून गेले.

# # # 📉 जागतिक पातळीवर भारत कुठे आहे?
पत्रकार हेले लिंग यांनी या घटनेचा व्हिडिओ 'X' वर शेअर करत लिहिले:
* जागतिक पत्रकारिता निर्देशांकात **नॉर्वे पहिल्या** क्रमांकावर आहे, तर **भारत १५७ व्या** क्रमांकावर फेकला गेला आहे.

* या बाबतीत भारताची स्पर्धा आता पॅलेस्टाईन, यूएई आणि क्युबासारख्या देशांशी सुरू आहे.

* *"ज्या देशांसोबत/शक्तींसोबत आपण (आमचा देश करार करतो) सहकार्य करतो, त्यांना प्रश्न विचारणे हे पत्रकार म्हणून आमचे कर्तव्य आहे,"* असेही त्यांनी सुनावले.

#तुमचे_यावर_काय_मत_आहे? आंतरराष्ट्रीय मंचावर प्रेस स्वातंत्र्यात जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या लोकशाहीच्या मुख्य स्तंभाला (माध्यमांना) असे टाळणे भारताच्या प्रतिमेला शोभणारे आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. 👇



18/05/2026

*प्रसिद्धीपत्रक*

*धानीवारीजवळील भीषण रस्ता अपघाताबाबत पालघर जिल्हा प्रशासनाचे निवेदन; १३ जणांचा मृत्यू*

पालघर, दि. १८ मे २०२६ : आज सायंकाळी अंदाजे ४:०० वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण रस्ता अपघाताबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना धानीवारी गावाच्या हद्दीत घडली.

प्राथमिक माहितीनुसार, साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणारे अंदाजे ३० ते ४० प्रवासी घेऊन जाणारा आयशर टेम्पो (नोंदणी क्रमांक MH 48 DC 7474) मुंबई-गुजरात मार्गावर चुकीच्या दिशेने जात होता. गावाजवळ पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या ट्रेलरने (नोंदणी क्रमांक NL 01 AC 9118) नियंत्रण गमावले. ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. तसेच एक मोटारसायकल (नोंदणी क्रमांक MH 04 EM 8425) देखील या अपघातात सापडली.

या अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रशासनाने पुष्टी केली आहे. बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य सुरू केले.

* १४ जखमींना तातडीच्या उपचारांसाठी डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
* इतर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1. सुरेश रत्ना लाखत
2. पांडू गणपत लाखत
3. काळू गोविंद लाखत
4. सुनील अर्जुन दांडेकर
5. चिमा गोविंद कुरहाडा
6. नमिता विठ्ठल दांडेकर
7. सारिका संतोष लाखत
8. आयुष सिताराम लाखत
9. सागर नामदेव शेंडे
10. वंदना शिवराम वळवी
11. सलोनी शिवराम वळवी
12. अजय अहाडी
13. रियांशी संतोष लाखत

जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय साधत आहेत.

या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासातील पुढील माहिती तसेच जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अथवा संबंधित माहिती देण्यासाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी ९४२१४८५५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

*पालघर जिल्हा प्रशासन*

18/05/2026

# Mumbai_Ahamadabad_Haiway

Address

Tarapur Road
Mumbai
501502

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोईसर तारापूर मिञ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to बोईसर तारापूर मिञ:

Share