Pimpri Chinchwad city PRO

Pimpri Chinchwad city PRO या पेज वर पत्रकारांसाठी घडलेल्या सर्व घडामोडींचे वृत्तांकन मिळेल.

माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार; किर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महार...
21/05/2026

माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार; किर्तनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांचे प्रतिपादन

संतांचे विचार आणि बाबासाहेबांचे आचरण हीच खरी प्रगतीची वाट;विठ्ठलनगर पुनर्वसन, पिंपरी येथे भीमजयंती निमित्त प्रबोधनात्मक कीर्तन संपन्न

​पिंपरी(प्रतिनिधी) दिनांक २१ मे २०२६:- "माणसांपेक्षा दगडांना जास्त महत्त्व देणारा समाज वाढू लागल्याने खऱ्या वारकरी विचारांचा पराजय होत आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे समता, शांती, बंधुता आणि न्याय आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देणे, हेच संतांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार होते असे प्रतिपादन प्रबोधनकार ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज यांनी केले.विठ्ठलनगर पुनर्वसन, पिंपरी येथे सम्यक स्वयंसेवा संस्थेच्या वतीने आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती महोत्सवात ते (दि.१९)बोलत होते.या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक स्वयं सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे, सदस्य ललिता बनसोडे,सिद्धांत बनसोडे, ज्योती बनसोडे ,कौसल्या पंडित यांनी केले होते.

यावेळी नगरसेवक राहुल भाऊ भोसले, नगरसेविका वैशालीताई घोडेकर (लोंढे), जेष्ठ पत्रकार नाना कांबळे , जेष्ठ पत्रकार
बाळासाहेब ढसाळ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, साम टीव्हीचे प्रतिनिधी पत्रकार गोपाल मोटघरे, सुनील उर्फ बाबू कांबळे, प्रविण शिर्के,रोहित खरगे, अविनाश कांबीकर, माऊली भोसले, युनूस खतीब, विकास गायकांबळे, देवा भालके, भीमराव बरकडे, सोमनाथ काळे, मुख्याध्यापक आल्हाट, अभिमान सोनवणे, युवराज भास्कर,सैलाजात चौधरी, उर्वशी गाढवे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.

​कीर्तनादरम्यान बोलताना प्रबोधनकार वाबळे महाराज म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी वैचारिक परंपरा लाभली आहे. महात्मा फुले हे जगद्गुरु तुकोबारायांच्या वाटेवरून गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुल्यांच्या विचारांच्या वाटेवरून चालले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुकोबारायांच्या विचारांचा वारसा जपत परकीय शाह्यांचा पाडाव केला आणि इथल्या बहुजन, तेली-तांबोळी, कुणबी समाजाला स्वराज्य मिळवून दिले.ज्ञानेश्वरांनी वेदांवर भाष्य न लिहिता गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली, कारण गीता त्यांना तथागत गौतम बुद्धांच्या धम्मपदासारखी वाटली. ज्ञानेश्वरीने समाजाला अहंकार आणि क्रोधापासून दूर राहून समता शिकवली. "तु मन हे मीचि करी, माझिये भजनीं प्रेम धरी" या ओवीचा अर्थ सांगताना 'भजन' म्हणजे केवळ टाळ वाजवणे नसून 'सेवा' करणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.

​ बाबासाहेब विलायतला गेले पण कधी तंबाखू, पानाच्या व्यसनाला शिवले नाही. त्यांचे आचरण शुद्ध होते म्हणूनच समाज सुधारला. ज्याचे आचरण शुद्ध नाही, त्याचा परमार्थ, राजकारण किंवा समाजकारण काहीच शुद्ध असू शकत नाही.जे पंचशीलाचे पालन करतात, तेच खरे धम्माचे लोक आहेत आणि तेच खरे वारकरी आहेत.महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक शोषित आणि सामान्य माणूस हा एकाच मातीचा आहे, ही समतेची भावना संत तुकाराम महाराजांनी रुजवली.आज चालत्या-बोलत्या माणसाला पाण्यासाठी ताटकळत उभे केले जाते, मात्र दगडाच्या देवावर अडीच-अडीच लीटर दूध-दही ओतले जाते. देव दगडात, मूर्तीत किंवा तीर्थात नसून तो माणसाच्या सत्य आचरणात आणि चांगल्या चरित्रात असतो.संत नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन शीख बांधवांना जोडण्याचे काम केले आणि 'गुरु ग्रंथ साहिब'मध्ये स्थान मिळवले, हा इतिहास सांगत वारकरी संप्रदाय समाज जोडणारा आहे, तोडणारा नाही, हा संदेश वाबळे महाराजांनी दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले होते. परंतु जेव्हा मला जातीभेद जाणवला तेव्हा मी त्यातून बाहेर पडून चळवळीमध्ये सामील होऊन समाज हितासाठी काम करू लागलो. हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम नक्कीच समाजाला दिशादर्शकठरेल असे मत मारुती भापकर यांनी व्यक्त केले.

यावेळी राईबाई वाघमारे, मस्के मामी ,रानुबाई किसन डोंगरे, शिलाबाई अभिमान सोनवणे, मंदा वाळके, आशावर्कर मिराताई वाघमारे, सुवर्णा कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला ललिता बनसोडे, ज्योती बनसोडे, सिद्धांत बनसोडे, कौसल्या पंडित, अशोक शिखरे, माऊली बोराटे, सिद्धार्थ वंसाळे ,रमेश कांबळे ,दत्ताभाऊ गायकवाड ,दिलीप पवार, सुरज गायकवाड,राहुल सोनवणे, लक्ष्मण जोगदंड, मुकुंद रणदिवे, प्रदीप टोपे , बी बी शिंदे, अशोक गायसमुद्रे, धुराजी शिंदे, दीपक भालेराव, सुधाकर इंगळे, रोहिदास वाघमारे, अशोक वाघमारे, रामभाऊ ठोके, गोविंद गाडे ,राजा नायक ,सामाजिक कार्यकर्ते सुनिता पाटोळे तसेच स्वप्न रुपी महिला बचत गट- विद्या जालिंदर खरात ,आयुष्य महिला बचत गट- सुवर्णा लखन काकडे,आई महिला बचत गट -अध्यक्ष गवळण अशोक शिखरे, सम्राट महिला बचत गट -स्नेहलता पाटोळे , ममता महिला बचत गट -ज्योती शिंदे ,आदिती महिला बचत गट -पूजा अशोक डोंगरे(पाटोळे), श्रद्धा महिला बचत गट -प्रवीण पठाण, तनिष्का महिला बचत गट- सारिका गायकवाड , खुशी महिला बचत गट -राणी हजारे (पाटोळे),भिमाई महिला बचत गट, रमाई महिला बचत गट, सावित्री महिला बचत गट ,गौतमी महिला बचत गट ,यशोधरा महिला बचत गट ,अहिल्या महिला बचत गट ,द्वारकाबाई महिला बचत गट आदी बचत गट व नागरिक उपस्थित होते.

Pimpri Chinchwad city PRO
082084 32041

Ram Bansode

15/05/2026

लोकशाही टीव्ही चॅनलने बातमीची दखल घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
PC CITY PRO
8208432041

15/05/2026

लोकशाही टीव्ही चॅनलने बातमीची दखल घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

दैनिक भास्कर ने बातमीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद!
15/05/2026

दैनिक भास्कर ने बातमीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद!

दैनिक लोकमत वृत्तपत्राने बातमीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद!
15/05/2026

दैनिक लोकमत वृत्तपत्राने बातमीची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद!

बातमीची दखल घेतल्याबद्दल दैनिक बंधुताचे खूप खूप धन्यवाद!
14/05/2026

बातमीची दखल घेतल्याबद्दल दैनिक बंधुताचे खूप खूप धन्यवाद!

डिजिटल पीसीएमसी न्यूज चे खूप खूप धन्यवाद!
14/05/2026

डिजिटल पीसीएमसी न्यूज चे खूप खूप धन्यवाद!

14/05/2026

For Media visuals 1

14/05/2026

For Media visuals 2

पवना धरण वाचवा! मुरूम माफियांवर MCOCA लावा!पवना धरणातून रात्रीतून 50 डंपर  हायवा मुरूम चोरी; मुख्यमंत्री व महसूल मंत्र्य...
14/05/2026

पवना धरण वाचवा! मुरूम माफियांवर MCOCA लावा!

पवना धरणातून रात्रीतून 50 डंपर हायवा मुरूम चोरी; मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांकडे कारवाईची मागणी - युवराज दाखले यांचा इशारा

पिंपरी-चिंचवड, दि. १४: प्रतिनिधी,मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत 50 पेक्षा अधिक हायवा डंपरद्वारे अवैध मुरूम व मातीचे उत्खनन सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.

"पवना धरण हे लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. याच धरणाच्या काठावरून JCB-पोकलेन लावून 20-30 फूट खोल खड्डे खणून मुरूम चोरला जात आहे. विना नंबर प्लेटच्या हायवा ट्रक गेव्हाण खडक, चांदेवाडी, ठाकूरसाई, ब्राह्मोली, कोथुर्णे, शिवली मार्गे चांदखेडकडे जातात. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही," असा गंभीर आरोप युवराज दाखले यांनी केला.

धोक्याची घंटा:
1. धरणाच्या भिंतीला धोका - साठवण क्षमता घटतेय

2. भूजल पातळी खालावली - शेतकरी देशोधडीला

3. पर्यावरणाचा ऱ्हास - 1966 चा महसूल कायदा व 1986 चा पर्यावरण कायदा पायदळी

4. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नापीक बनवल्या

युवराज दाखले यांच्या मागण्या:

1. मुख्यमंत्र्यांनी विशेष भरारी पथकनेमून 24x7 गस्त लावावी

2. मुरूम माफिया व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल करावेत

3. पवना धरण 5 किमी परिसर "No Mining Zone"घोषित करावा
4. ड्रोन सर्व्हे करून दंडात्मक वसुली करावी

5. जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून 7 दिवसांत अहवाल मागवावा

6. सर्व हायवा-डंपर जप्त करून वाहतूक बंद करावी

मुख्यमंत्री देवेंद्रजी व महसूल मंत्री बावनकुळे साहेब, पवना वाचवा. 7 दिवसांत कारवाई न झाल्यास शिवशाही व्यापारी संघ, व शेतकरी मिळून मंत्रालयासमोर ठिय्या देऊ. मुरूम माफियांना मावळातून हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही," असा सज्जड इशारा युवराज दाखले यांनी दिला आहे.

Pimpri Chinchwad city PRO
082084 32041

दैनिक केसरी १४ मे २०२६
14/05/2026

दैनिक केसरी १४ मे २०२६

Address

Pimpri, Chinchwad
Pimpri
411017

Telephone

+918208432041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri Chinchwad city PRO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pimpri Chinchwad city PRO:

Share