Sagar Takalkar gurji pune

Sagar Takalkar gurji pune Wakad pune

S R T
07/07/2021

S R T

30/03/2021

#पितृपक्ष
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन पितृपक्ष या विषयी थोडि माहिती जाणून घेवु.श्रध्देने जे केले जाते त्याला श्राध्द अशी संज्ञा शास्त्रकारांनी दिली आहे.
मृतव्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो त्याला सांवत्सरीक श्राध्द अशी संज्ञा आहे.पितृपक्षात जे श्राध्द करतात त्याला महालय श्राध्द अशी संज्ञा आहे.
आपले आकाश हे ३६०अंश कल्पलेले असुन. सूर्य हा सहाव्या राशीत म्हणजे "कन्या "राशीत गेल्यानंतर तो वृश्चिक राशीत जाण्यापर्यंतचा काऴ जो जवऴपास दोन महिने असतो तो पर्यंत महालय श्राध्द करता येते.
भाद्रपद कृ.१ ते भाद्रपद अमावास्या या कृष्णपक्षात महालय श्राध्द रोज करावे असे वचन आहे.सांप्रत सलग १५ दिवस श्राध्द करणे हे व्यावहारीक दृष्ट्या थोडे कठिण असल्याने वडिलांच्या निधन तिथीस किंवा अमावास्येला महालय श्राध्द एकदाच केले जाते. हा हि पक्ष मान्य आहे.
सांवत्सरीक श्राध्दात त्रयीलाच उद्देशुन पिंडदान केले जाते (आई आजी पणजी किंवा वडिल आजोबा पणजोबा) परंतु # महालय_श्राध्दात_सर्व
# नातेवाईकांना_पिंडदान_केले_जाते .
पितृत्रयी -वडिल आजोबा पणजोबा
मातृत्रयी -आई आजी पणजी
मातामहत्रयी -आईचे वडिल आजोबा पणजोबा
मातामहित्रयी -आईची आई आजी पणजी
सापत्न मातु: -सावत्र आई
पत्नी - पत्नी निवर्तली असेल तर
पुत्र -उपनयन झालेला पुत्र गेला असेल तर
दुहिता- विवाहित कन्या निवर्तली असेल तर
पितृव्य - सख्खे काका (काकू गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा. चुलत भाउ गेला असेल तर ससूत असा सोबत उल्लेख करावा)
मातुल -सख्खा मामा (मामी गेली असेल तर सपत्नीक व मामेभाउ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा)
भ्रातु: -सख्खा भाउ (भावजय गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा)
पितृभगिनी -सख्खी आत्ये (आत्येचे यजमान गेले असतील तर सभर्तृ असा उल्लेख करावा व आत्येभाउ गेला असेल तर ससूत असे म्हणावे)
मातृभगिनी -सख्खी मावशी (यजमान गेले असतील तर सभर्तृ व मावसभाउ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा)
आत्मभगिनी- सख्खी बहिण (तीचे यजमानहि निवर्तले असतील तर सभर्तृ असे संबोधावे)
श्वशुर -सासरे (सासूबाई निवर्तल्या असतील तर सपत्नीक असे म्हणावे)
गुरु -ज्यांनी गायत्री उपदेश केला ते (वडिलांनी मुंज लावली असेल तर वडिल) अन्य कोणी मुंज लावली असेल तर ते गुरु.
आचार्यगुरु -ज्यांनी विद्या व शिक्षण दिले
शिष्य-आपला विद्यार्थी
आप्त - वरील नावांमध्ये ज्यांचा उल्लेख नाहि परंतु ज्यांचे आपल्याशी आपुलकीचे संबध होते व ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत या सर्वांना आप्त या संज्ञेत पिंडदान करु शकतो.
सर्व मृत नातेवाईंकांची नाव व गोत्रासहित एका वहित नोंद ठेवावी व पुरोहितांच्या सल्यानुसार वरील प्रमाणे सुसुत्रीत यादि बनवावी.
या शिवाय चार धर्मपिंडांची योजना महालयात केली आहे.
मित्र, सखा, पशू, वृक्ष, जाणतेपणी अजाणतेपणी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचाकरता.जे आपल्याकडे आश्रीत होते त्यांचा करताहि धर्मपिंड आहे.
मातृवंशात, पितृवंशात गुरुंच्या वंशात किंवा अाप्तबांधवात ज्यांना संतती नसल्याने पिंडदान होत नाहिये त्यांचाकरता ज्यांचे क्रियाकर्म झाले नाहि.जे जन्मताच अंध, पंगु जन्मले त्यांचा करता व विरुपांकरता हि धर्मपिंड अाहे.
जे कुंभीपाक नामक नरकात पाप कर्मापुऴे खितपत पडले आहेत त्यांचाकरताहि धर्मपिंड आहे.
असे चार धर्मपिंड महालयात दिले जातात.
महालय श्राध्द किती प्रकारात करता येईल? कारण अनेक श्रध्दावान आस्तीक असतात परंतु नोकरीमुऴे किंवा धावपळीमुऴे त्यांना काहिवेळा थोड कठिण होत त्यांचा करता
१ - दोन किंवा पाच ब्राह्मण, किंवा चटावर दर्भबटू ब्राह्मण योजना करुन श्राध्दस्वयंपाक करुन सपिंडक महालय
२ -आमान्न म्हणजे शिधा सामग्री योजना करुन आमश्राध्द
३-दूध, केऴ, अल्पोपहार यांची योजना करुन हिरण्यश्राध्द यात पिंडदान नसते
४ ब्रह्मार्पण - दोन, पाच ब्राह्मण व सवाष्ण कोणी गेली असेल तर सवाष्ण (सुवासिनी) पूजन करुन अन्नसंतर्पण यात पिंडदान नसते.
५-एखाद्याची आर्थीक स्थिती नसेल किंवा मनुष्यबऴ वयोमानानुसार कमी असेल तर "शमीपत्रा "अेवढा पिंड दिलेलाहि शास्त्र संमत आहे.शमीपत्र हे भाताच्या शिताअेवढेच असते.
यातील काहिच जमत नसल्यास घोर वनात जावुन दक्षिणेकडे तोंड करुन उभे राहुन आपल्या दोन्हि काखा वर करुन माझी आर्थीक स्थिती नसल्याने मी पिंडदान किंवा पितरांचे श्राध्द करु शकत नाहि या बद्दल क्षमायाचना करुन पितरांचे स्मरण केले तरी श्राध्द होते.
श्राध्दात विकिर व प्रकीर असे दोन भाग दिले जातात .
अग्निदाह झालेले किंवा अग्निदग्ध न झालेले गर्भस्त्रावात मृत झालेले ज्यांना रुपहि प्राप्त न झालेले या सर्वांनाहि अेक भाग श्राध्दात महालयात दिला जातो.
ज्या देवतांना सोमभाग मिऴत नाहि त्यांना हि अेक भाग श्राध्दात दिला जातो.
रामचंद्रानी वनात असताना दशरथ राजाला कंदमुऴाचे पिंड दिले होते असाहि उल्लेख रामायणात आहे.
कन्याराशीत सूर्य गेल्यावर तुळ राशीत सूर्य असेपर्यंत तो पृथ्वीच्या बराच जवऴ असतो.पितृगणांकरता दिलेले कव्य (अन्न भाग) हा सर्वप्रथम सूर्यमंडलात जातो तिथुन तो चंद्रमंडलात जातो. चंद्रमंडल हे स्वयंप्रकाशीत नसुन सूर्यनारायणांची सुषुम्ना नाडि या चंद्र मंडलाला प्रकाशीत करते दर महिन्याच्या अमावास्येला चंद्रमंडल व सूर्यमंडल एकत्र येत असते त्यामुऴे अमावास्येला पितरांना दिलेले अन्न अधीक जलद गतीने त्यांना प्राप्त होते.
कन्याराशीच्या 10 अंशापासून ते तुळ राशीच्या 10 अंशापर्यंतच काळात सूर्य व पृथ्वी या दरम्यानच्या अंतर सर्वात कमी असते त्यामुऴे पितरांना दिलेला कव्यभाग (अन्न) पितरांपर्यंत लवकर पोचते.
श्राध्द हि व्यवस्था मनीऑर्डर प्रमाणे जाणावी.उदा.मी वेंगुर्ला पोस्ट ऑफीस मधे 500 रु.अेक नोट मुंबईला भावाकडे पाठवली तर माझ्या भावाला मुंबईत तीच नोट मिऴेल का? नाहि ना.त्याला त्या पोस्टात उपलब्ध असलेले पाचशे रु.मुल्याचे चलन मिऴेल (100 च्या पाच नोटा मिऴतील किंवा 50 च्या दहा नोटा मिऴतील) पण चलन तेवढेच मिऴेल.तद्वत आपण जे अन्न पितरांच्या उद्देशाने देतो त्याच वेऴी तेवढच अन्न
आपल्या पुर्वजांनी ज्या योनीत जन्म घेतला असेल त्या योनीला आवश्यक जो आहार असेल त्या रुपाने मिऴते.
आता श्राध्दात पितर खरेच जेवतात का? हा हल्लीचा फार मोठा प्रश्न आहे.
आपण जेव्हा श्राध्दान्न जेवतो तेव्हा ते कितीहि अल्प जेवले तरी शरीराला एक प्रकारची सुस्ती व जडपणा अनुभवता येतो.परंतु एखाद्या यज्ञ किंवा मंदिरात कितीहि भरपेट प्रसाद घेतला तरी सुस्ती जडपणा जाणवत नाहि मंदिरातील प्रसादात कांदालसूण, गरममसाले वगैरे काहि नसल तरी तो चवीला सुमधुरच लागतो कारण त्या अन्नावर भगवंताची कृपा असते व श्राध्दान्नावर पितरांची "आसक्ती "असते.त्यामुऴे शरीराला जडत्व येत.एरवी खीर वडे खाल्ले तर सुस्ती येत नाहि.
हा अनुभव घ्यायला हरकत नसावी.स्वयंपाक हा घरीच केलेला असावा.भरपुर प्रकार केले नाहित तरी चालेल परंतु सात्विक पणे आपल्या पूर्वजांना आपल्या हातचे दिलेले अन्न हे अधीक प्रिय असते.त्यातली आपुलकी व कृतज्ञता हॉटेल किंवा कँटरींगच्या अन्नाला कधीच येणार नाहि.सूनांनी, लेकींनी केलेला वरणभात हा आई वडिलांना पंचपक्वानांपेक्षा अधीक प्रिय असतो हे सदैव ध्यानात ठेवावे
पितृपक्षात आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना संतुष्ट करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

 #वास्तूविचारापूर्वी_अष्टदिशांचा_विचार_करा..!चैतन्यऊर्जा वास्तू सोल्यूशनच्या नव्या संकल्पात सर्वांचं स्वागत. वास्तूविचार...
14/02/2021

#वास्तूविचारापूर्वी_अष्टदिशांचा_विचार_करा..!

चैतन्यऊर्जा वास्तू सोल्यूशनच्या नव्या संकल्पात सर्वांचं स्वागत.
वास्तूविचार करण्यापूर्वी आपल्याला अष्टदिशांचा विचार कसा करायचा त्यावर आपण आजच्या पहिल्या लेखमालेत आणि एकूण दोन भागात सविस्तर पाहणार आहोत.
घर बांधताना सर्वात आधी आपण भूमी पाहातो प्लॉट पाहतो. वास्तूतज्ज्ञ त्यावेळी प्रत्येकाला मार्गदर्शनासाठी मिळतीलच हे नक्की नसतं. पण वास्तूतज्ज्ञाचा सल्ला आपण घेणं केव्हाही श्रेष्ठ आणि श्रेयस्कर होय.
प्लॉट घेताना तो कोणत्या बाजूला उंच आहे कोणत्या बाजूला सखल आहे. जागेत किवा जागेच्या चहूबाजूंपैकी कोणत्या बाजूला चढ उतार आहेत त्यावरून जागेचे शुभाशुभत्व ठरत असते. त्यानुसार सर्व दिशा उपदिशांच्या उंचसखलपणामुळे प्राप्त होणार्या शुभाशुभ फलांची आज आपण माहिती घेणार आहोत. वास्तू बांधकाम कोणत्या दिशेचे किती करावे याचाही विचार झाला पाहिजे...!
चला सविस्तर पाहू दोन भागात..
भाग -१

१) पूर्वदिशा उंच असल्यास जागेच्या मालकाचे पुरूषबल कमी होते. स्त्रियांचे बल वाढून घरात पुरूषांचे अपमान होण्याचे प्रसंग घडतात.
२) आग्नेय दिशा उंच असल्यास शुभसौख्य लाभते.
३) दक्षिण दिशा उंच असल्यास आरोग्यवृध्दी होते आणि सौख्य लाभते.
४) नैऋत्य दिशा उंच असल्यास सर्व कार्यात यश, किर्ती वंशवृद्धी होते.
५) पश्चिम दिशा उंच असल्याने पुरूषांचे बल वाढून पुरूषांचा समाजात मान सन्मान वाढून गौरव प्राप्त होतो.
६) वायव्यदिशा उंच असल्यास आरोग्यवृध्दीसह धनधान्य लाभ.
७) उत्तर दिशा उंच असल्यास किवा उत्तरेचे बांधकाम दक्षिणेपेक्षा उंच असल्यास धननाश व रोग होतो.
८) इशान्यदिशा उंच असल्यास घरात नेहमी कलह, मानसिक सूख नसणे, आणि वंशवृध्दीत अडचणी.
९) मध्यभाग उंच केल्याने धनधान्याची वृध्दी.
१०) पूर्वेकडे उतार असेल तर संतती बुध्दीमान होईल. अग्नेय दिशेकडे उतार असल्यास अग्नीभय.अपघात संभवतात.
११) दक्षिणेकडे उतार असल्यास हत्या, आत्महत्त्या, विविध प्रकारचे दुर्घटना घडतात.
१२) नैऋत्येला उतार असल्यास भुतप्रेत बाधा, हत्त्या असाध्य रोग होतात.
१३) पश्चिमेला उतार असल्यास घरातील स्त्री संतती धाडसी होते.
१४) वायव्य दिशेचा उतार रोग व चिंता दाखवतो.
१५) उत्तरेचा उतार ऐश्वर्यवृध्दी आणि धनलाभ.
१६) ईशान्य दिशेचा उतार वंशवृध्दी, ऐश्वर्यवृध्दी, विद्या, विज्ञानवृध्दी सुख लाभ.
१७) जागेच्या मध्यभागी खड्डा अथवा उतार धननाश, दु:ख रोग दारिद्र्ययोग.
१८) उत्तर, ईशान्य, पूर्व या देशांपेक्षा आग्नेय, दक्षिण, नैऋत्य पश्चिम वायव्य दिशांना उतार असू नये.
१९) आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य या दिशांपेक्षा उत्तर इशान्यपूर्व या दिशांना उतार असल्यास अनेक प्रकारांनी धनलाभ, ऐश्वर्य व वैभव प्राप्त होते.
२०) इशान्यदिशेपेक्षा पूर्वेकडे उतार असल्यास बुध्दीनाश.
२१) ईशान्येपेक्षा आग्नेयेकडे उतार जास्त असल्यास अग्नीदाहकता येते. खर्च फार होतात. जागामालकाचे निर्णय सतत बदलतात.
२२) ईशान्येपेक्षा दक्षिणेकडे जास्त उतार असल्यास मालकाला नैराश्य येते. हत्त्या आत्महत्या घडतात.
२३)ईशान्येपेक्षा नैऋत्येस जास्त उतार असेल तर भूतबाधा अनेक प्रकारचे उपद्रव संभवतात.
२४) जागा किवा वास्तूच्या ईशान्येपेक्षा पश्चिमेकडे ुतार असल्यास स्त्रीया स्वच्छंदी अथवा स्त्रीसंतती नियमबाह्य वागण्याची वृत्ती वाढते.
२५) ईशान्येपेक्षा वायव्येकडे अधिक उतार असल्यास रोगोत्पत्ती होऊन आरोग्य बिघडते.

माहिती स्रोत - वास्तू वैभव
(पोशेट्टी अनलदास)

याबाबत पुढील माहिती लवकरच पाहू..
क्रमश:

-- ज्योती खिरे.
वास्तूतज्ज्ञ.
(Architectural Interior Designer)
चैतन्यऊर्जा वास्तू सोल्यूशन, शिवाजीनगर, नांदेड.
संपर्क - 7774050474

15/12/2020
02/12/2020
27/01/2020

🍀उदकमेमरी🍀आज गुरुजीग्राम मार्फत उदकशांत संपन्न झाली.
हिंदू धर्मात वर्षातून एकदा घरात उदकशांती करावी असे सांगितले आहे, पण आपण या गोष्टीला मागासलेपणा समजून अमान्य करतो. आता हे वाचा.

*पाण्याला स्मृती असते का?*
*यावर काही संशोधन करण्यात आले आहे का?*

*हो ! पाण्याला स्मृती असते याबाबत जगातील अनेक देशात संशोधन सुरू आहे.*

*याबाबाबत विस्तृत माहितीसाठी डॉ. मासरू ईमोटो या जपानी संशोधकांचे प्रयोग अवश्य पाहावेत. युट्युब वरील वॉटर या माहितीपटात अधिक माहिती मिळू शकते.*

एक घटना मध्यंतरी वाचनात आली होती, याची सत्यता माहीत नाही. "गुरुजीग्राम" उत्तर कोरियामध्ये एका बंद खोलीत काही शास्त्रज्ञ आणि सैन्यदलातील अधिकारी जैविक हत्यारे आणि त्यांची संहारक क्षमता यावर चर्चा करीत होते. चर्चेनन्तर अचानक सर्व अधिकारी उलट्या आणि जुलाबाने त्रस्त झाले आणि त्यांना दवाखान्यात दाखल कराव लागल. त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. हे सर्व अधिकारी संरक्षण क्षेत्रातील दिग्गज असल्याने त्यांना सर्व सुरक्षा व्यवस्था चोख होती. या चर्चेदरम्यान त्यांना काहीही बाहेरचे खायला प्यायला देण्यात आले नव्हते. अखेर या चर्चासत्रातील पाण्याचे नमुने तपासल्यावर पाण्यामध्ये कोणताही घटक मिसळला नसूनही पाणी विषारी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या चर्चेतील विषारी भावना आणि विखार पाण्यात उतरल्याने पाणी विषारी झाले होते.

वरकरणी हे हास्यास्पद आणि अविश्वसनीय वाटते. परंतु डॉ. मासरू ईमोटो यांनी हे प्रयोगातून सिद्ध करून दाखविले. "गुरुजीग्राम "डॉ. मासरू ईमोटो यांनी जपानमधील पवित्र झऱ्याच्या पाण्याला विशिष्ट भावना देऊन त्याचा पाण्याच्या स्फटिकीकरणावर होणारा परिणाम सूक्ष्म दर्शिकेखाली अभ्यासला. वेगवेगळ्या भावनांना पाण्याची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे होती.

या प्रयोगात वापरलेले पाणी आणि इतर सर्व गोष्टी सारख्या होत्या फक्त प्रयोगाकर्त्याने पाणी गोठवताना पाण्याशी वेगवेगळ्या भावना बोलून दाखविल्या होत्या. हा प्रयोग अनेक वेळा करूनही येणारा परिणाम तोच होता.

जर्मनीतील एक विद्यापीठामध्ये पाण्याच्या भांड्यात वेगवेगळी फुले बुडवून ते पाणी याच प्रयोगप्रमाणे गोठविण्यात आले. प्रत्येक पाण्याचा स्फटिक वेगळ्या आकाराचा होता, परंतु सर्वात विशेष बाब म्हणजे हे स्फटिक त्यामध्ये बुडविलेल्या फुलाच्या आकाराशी साधर्म्य दाखवत होते.

पाण्याला धन्यवाद, प्रेम, समाधान, दया, करुणा, ज्ञान, सत्य या भावना दिल्यावर पाण्याचे स्फटिक सुंदर आणि स्पष्ट तयार झाले. तर द्वेष, असमाधान, मूर्खता, इ. नकारात्मक भावना दिल्याने पाण्याचे स्फटिक अनियमित आकाराचे तयार झाले. द्वेष भावनेच्या पाण्याचे स्फटिक तयारच होऊ शकले नाहीत. त्याच प्रमाणे जपानी शास्त्रीय संगीत पाण्याला ऐकवल्यावर त्याचे आकर्षक स्फटिक तयार झाले परंतु पाश्चिमात्य कर्कश संगीताने असे स्फटिक तयार होऊ शकले नाहीत.

पाण्याच्या याच गुणधर्माचा वापर पारंपरिक उपचारामध्ये अनेक संस्कृतीमध्ये गेला आहे. होमिओपॅथिक औषधे बनविण्यामध्ये सुद्धा याच गुणधर्माचा वापर होतो. अनेक धार्मिक स्थळांमध्ये देण्यात येणाऱ्या औषधी पाण्याचा परिणाम हे पाण्याच्या स्मृतीमुळे असू शकतात.

आपण जर धार्मिक असाल तर मंदिरात दिले जाणारे तीर्थ हे गोड वाटते. खरेतर हे सामान्य पाणीच असते. परंतु जेव्हा या पाण्याला आपण पवित्र मानून पितो तेव्हा याची चव त्याच्या मूळ स्रोताच्या पाण्यापेक्षा अधिक गोडसर जाणवते. हा परिणाम पाण्याला मिळालेल्या भावनेमुळे होतो. याबद्दल भारतात अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. आयुर्वेदात देखील मंत्रोच्चारीत पाणी याच गुणधर्मचा वापर करते, हे सिद्ध झाल्यास पारंपरिके भारतीयांना याचे ज्ञान पूर्वापार होते असेच म्हणावे लागेल.

एक प्रयोग मी स्वतः काही प्राण्यावर केला होता. मी एका प्राणी अनाथालयात असताना दाखल होणाऱ्या आजारी प्राण्यांना Sorry आणि I love you आशा भावना दिलेले पाणी पाजले. माझ्या सहकाऱ्यांना माहीत नसल्याने त्यांनी साधे पाणी दिले. भावनायुक्त पाणी दिलेले प्राणी इतर प्राण्याच्या तुलनेत उपचारांना अधिक चांगले प्रतिसाद देत होते असे डॉक्टरचे निरीक्षण आले. डॉक्टरांना कोणत्या प्राण्याला कोणते पाणी दिले होते याबद्दलची माहिती नव्हती हे विशेष! त्याच प्रमाणे सुकत चाललेल्या काही झाडांना देखील मंत्रोच्चारीत अथवा भावना दिलेले पाणी दिल्यास त्यांच्यातही सकारात्मक बदल जाणवतात.

आपण रोज पित असलेल्या पाण्याशी अर्धा मिनिट फक्त सकारात्मक भावना देऊन ते पिल्यास दिवसभर सकारात्मक ऊर्जा शरीरात जाणवते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

पाणी सतत सभोवतालच्या वातावरणाशी सतत माहितीची देवाण घेवाण करते. समुद्र हा प्रचंड मोठा माहितीचा साठा आहे. ही माहिती ते पाणी ग्रहण करणाऱ्यापर्यत पोचते, असे काही प्रयोगात आढळले आहे. ही माहिती कशी साठविली जाते हे अद्याप स्पष्ट माहिती नसले तरी हे सत्य आहे हे आज शास्त्राने मान्य केले आहे. "गुरुजीग्राम" याबाबत अधिक माहितीसाठी water crystals and emotions असे गुगलवर शोधल्यास आणखी माहिती मिळू शकेल.

आपल्या शरीरात ७०% पाणी असल्याने पाण्याच्या या गुणधर्माचा वापर मानवी उत्क्रांती आणि प्रतिभा वाढविण्याच्या दृष्टीने तसेच स्वयं विकासासाठी करण्याबाबत अनेक देशात संशोधन सुरू आहे.

पाणी आसपासची माहिती साठवते आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर पाण्याच्या रेणुला देखील संक्रमित करते असे दिसून आले आहे. आपल्या घरात दूरदर्शनवर आपण जे काही पाहत आहात त्याचे गुण तुमच्या घरातील पाण्यातून आपल्या शरीरात जात आहेत हे लक्षात घ्या. नकारात्मक बातम्या, मालिका इ. घरातील आणि शरीरातील नकारात्मकता वाढवतात हे देखील संशोधनात सिद्ध झाले आहे. लग्न,मुंज,देवक ग्रहमख,( ग्रहयज्ञ) वास्तुशांत,शांतीकर्म,तसेच कुठल्याही पूजांसाठी संपर्क

12/11/2019

वास्तुशांती म्हणजे त्या वास्तुमधील अणू-रेणू वर झालेली एक प्रभावी परिणामकारक अशी एक वैदिक प्रक्रिया होय...

नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे आवश्यक आहे. घरात होम-हवन, यज्ञ असे धार्मिक कार्य करणे आवश्यक आहे. वास्तुशांती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुशांती केल्यानंतर घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो. ज्यामुळे आयुष्यात आनंद सुख-समृद्धी प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर, वाद्याच्या गजरात, कुलदेवतेची पूजा, आलेल्या लोकांचा सन्मान, ब्राह्मणांना प्रसन्न करून घरात प्रवेश करावा. गृह प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे शुभ मानले जाते.

आपल्या वास्तूची वास्तूशांत करण्यासाठी आजच गुरुजी पुढील क्रमांकावर संपर्क करा- 9823568437

order 9823568437
30/09/2019

order 9823568437

Address

Chinchawad Pune
Pune
411017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagar Takalkar gurji pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share